कल्याण महात्मा फुले पोलिसानी सहा महिन्यात शोधले गहाळ झालेले 44 मोबाईल

Views: 530
शेअर करा:

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन, बस स्टँड, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, सरकारी हॉस्पिटल, बाजारपेठ आदि वर्दळीच्या ठिकाणी मागील वर्षभरात नागरिकांच्या मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अधिकारी अंमलदाराचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गेल्या सहा महिन्यात गहाळ झालेले साडे पाच लाख रुपये किमतीचे ४४ मोबाईल हस्तगत केले आहेत.  हे मोबाईल आज एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, दीपक सरोदे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळेल याबाबत नागरिकांना विश्वास नव्हता, सहा महिन्यानंतर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून येत होता, मोबाईल शोधून दिल्याने  नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 


Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत