Views: 517
कल्याण : १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती निमित्ताने उल्हासनगरमध्ये दि बुध्दीस्ट साेसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० गरजू विद्यार्थ्याना ९० डझन वही व पेन यांचे वाटप करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतलेले शिक्षणाचे महत्व घरोघरी पाेहचविण्यासाठी वही व पेन यांचे वाटप केले असल्याचे संस्थेचे ठाणे जिल्हा सचिव अरविंद उबाळे यांनी सांगीतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे विभाग अध्यक्ष विजय खंडागळे, डी. एस.भोसले, कीर्तीशाली, कविता उबाळे, लक्ष्मी खंडागळे, लता पडघान, माणिक उबाळे, प्रज्ञा म्हैसकर, संजय पगारे, यांनी विशेष सहकार्य केले.



