की बातमुळे नरेंद्र मोदींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात – माजी आमदार नरेंद्र पवार

Views: 351
शेअर करा:

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा संवाद कार्यक्रम कल्याण पश्चिममधील भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्रमांक ३६ बैलबझार येथील १५२ नंबर बूथवर परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी यांच्या निवासस्थानी ऐकण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक मोदींनी केले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, त्या निमित्ताल देशाच्या कानाकोपऱ्यात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येते. देशाच्या युवा वर्गाने राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाने स्वतःला झोकून दिले आहे हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच कौशल्य विकासावर भर दिल्याने भारत प्रगतीच्या दिशेने जात असल्याचेही पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात संवाद कार्यक्रमात सांगितले. या संवाद कार्यक्रमामुळे पंतप्रधान मोदी यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत बूथपर्यंत पोहचत असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत