Views: 423
कल्याण : चार दिवसापासून पावसा पाण्यात कल्याण स्टेशन दीपक हॉटेल येथील रस्त्यावर रेंगाळत राहिलेल्या आत्माराम वेलेकर (वय 65) आजोबांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे सदस्य रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने जीवन दान मिळाले आहे.
हजारो रिक्षा चालक लाखो प्रवासी दिवसभरात कल्याण स्टेशन परिसरात येत जात असतात. परंतु चार दिवसापासून माणुसकीची जाण असणारी एकही व्यक्ती पुढाकार घेऊ शकली नाही. जिजाऊ संस्थेचे सदस्य रुपेश पाटील यांनी कल्याण पश्चिम विभागात सलग दोन महिन्यात तिसऱ्या वयोवृद्धाचे प्राण वाचवले व पुढील वैद्यकीय उपचार करण्यासाठी सेंट कार्टर अनाथ आश्रम बदलापूर येथे दाखल केले आहे.
आत्माराम वेलेकर (वय,65) आजोबांना कोणी ओळखत असल्यास 9222226064 रुपेश पाटील यांना संपर्क साधावा.



