रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा;  रिक्षात विसरलेला मोबाईल केला परत

Views: 460
शेअर करा:

कल्याण : रिक्षात विसरलेला मोबाईल रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे प्रवाशाला परत केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.

  म्हारळ येथे राहणारे नरेश भगत हे प्रवाशी कल्याण स्टेशन ते उल्हासनगर दरम्यान प्रवास करत असताना सॅमसंग कंपनीचा वीस हजार किमतीचा मोबाईल रिक्षात चुकुन विसरले. भगत यांच्या मोबाईल फोन मध्ये महत्वाचा डाटा व अत्यावश्यक नबंर सेव होते. मोबाईल हरविल्यामुळे ते चितांतुर झालेले त्यांनी कल्याण स्टेशन वर लोहमार्ग वाहतुक पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. 

याबाबतब चौकशी केली असता समजले की, रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते तथा रिक्षाचालक अरविंद भोसले यांच्या रिक्षात हा मोबाईल हे प्रवासी विसरले होते. रेल्वे वाहतुक पोलिस अमलदार मंगेश भोसले, गोपाळ सावंत यांच्या समक्ष रिक्षाचालक अरविंद भोसले यांंनी प्रामाणिकपणे प्रवाशी नरेश भगत यांना मोबाईल परत केला. अरविदं भोसले यांचे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर व पदाधिकारी यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत